शेतकऱ्यांची दिवाळी आणी एक लुप्त होत असलेली परंपरा |शेणाच्या गवळणी | ग्रामीण परंपरा | दिवाळी विशेष
दिवाळी आणी शेणाच्या गवळणी - एक परंपरा..! आज काल दिवाळी म्हणजे मोती साबणाची आंघोळ, कैक प्रकारचा फराळ आणी आतिशबाजीने परिसर दणाणून सोडणे इतकचं तिच स्वरूप राहीलं आहे.. पण मूळ दिवाळी जी कृषी प्रधान परंपरेतून आली आहे तीचे एक वेगळचं स्वरूप होतं.. त्याला धर्माच्या गंधा पेक्षा लोकपरंपरेचा आणी नैसर्गिक इतिहासाचा मोठा वसा होता.. कारण दिवाळी हा कृषीजीवनावर आधारीत सण आहे. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारीत विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या होतात.. त्यातून समृध्द लोकजीवनाचे दर्शन घडतं.. आज मी तूम्हाला अशाच एका लूप्त होत चाललेल्या गोवळ्या / गवळणी या परंपरे विषयी सांगणार आहे.. महाराष्ट्रात दिवाळीच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये अंगणा मध्ये शेणा पासून तयार केल्या जाणाऱ्या गवळणी.. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वासुबारसेला गाई म्हशी ची ओवाळणी केली जात असे आणी दिवाळीची सूरूवात होत असे.. त्या नंतर धनत्रयोदशी च्या दिवशी पहिली गवळण तयार केली जायची.. ज्यात गाई च्या शेणा पासून ग्रामीण जन जीवन आणी ऐतिहासिक घटना क्रम साकारला जात असे.. अर्थातच घरातील ...