Parbhani Violence | परभणी चे संविधान प्रकरण आणी संयम, स्व:नियंत्रण हरवलेला आंबेडकरी समाज | एक कडवट आत्मचिंतन आणी प्रशासकीय कारवाईचे परिक्षण
★ भाग - एक :- कडवट पण सत्य, समाजाच्या कृत्याचे आत्मचिंतन
एखाद प्रकरण आपण कसं हाताळाव हे कधी आपल्याला कधी कळणार..? एका समाजकंटकाची ची सजा पूर्ण समाजाला का..? महाड च्या सत्याग्रहा वेळी सूद्धा जातीवादी लोकांन कडून दगडफेक आणी अमानुष मारहाण झाली होती हवं तर बाबासाहेबांनी आदेश दिला असता तर आपल्या लोकांनी महाड च नामोनिशान मिटवलं असतं, पण बाबासाहेबांनी सगळ्याना समंजसपणा व धीराने घेण्यास सांगितले आणी योग्य विरोध दर्शवून त्यांनी पूढे सर्व आरोपीनां कायदेशीर धडा शिकवला..! मग आपण का त्यांच अनुसरण करत नाही..? दर वर्षी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवासाला करोड़ों ची पूस्तक विकत घेणारा समाज म्हणून मिरवतो मग त्या पूस्तकातील ज्ञान आणी बाबासाहेब डोक्यावरून डोक्यात कधी घेणार..?
मान्य आहे कि बाबासाहेब, संविधान आपल्या अस्मितेचे विषय आहेत पण प्रत्येक वेळी भावनेच्या भरात वाहून जाणे चूकीचे आहे..! जो पर्यंत एखादे प्रकरण कायदेशीर आणी शांततेच्या मार्गाने हताळता येईल तो पर्यंत ते शांततेत हाताळले पाहिजे, हिंसा ही कोणत्या हि प्रकरणाची शेवटची पायरी असते.. ! आणी तरी ती करूण काही प्राप्त होत नाही.. मान्य आहे लोकाच्या मनात राग होता त्यानी आरोपी ला खूप चोप पण दिला, धडा शिकवला पण पूढे निष्पाप लोकांच जे नूकसान केलं ते जरा ही समर्थनीय नाही.. एखादा शिक्षित समाज कधीच त्याच समर्थन करू शकत नाही..!
...✍️दsuryawanshi
★ भाग - दोन :- प्रकरणाची सध्य स्थिती आणी लक्षात घेण्यासारख्या शंका व उपस्थित प्रश्न..?
१) परभणी मध्ये जे घडलं किंवा त्या नंतर जे आता घडत आहे त्या सर्वात विचार करण्यासारखे काही मूद्दे आणी प्रश्न आहे ते म्हणजे हे सर्व सुनियोजित कट असल्याचे जाणवते त्याचे कारण म्हणजे कोणत्या तरी गोष्टी वरील लक्ष भटकवण्यासाठी किंवा कसला तरी बदला घेण्यासाठी हे सर्व प्रशासनाला हाती धरून चालू आहे का असा प्रश्न पडतो..? कारण सध्या महाराष्ट्रात ईवीएम विरोधी वातावरण जोर धरत आहे.. त्याच वेळी राज्यात भाजप ला जो लोकसभेला मोठा फटका बसला होता तो याच संविधान प्रेमी लोकां मूळे संविधान बदलण्याच्या प्रचारा मूळे बसला होता.. त्यावेळी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शांत बसलेला संघ परिवार आता राज्यात संपूर्ण ताकदीने परत सत्तेत येताच अशा घटना घडतात, बरं महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजप शासित सरकार आणी त्यांचा मूख्यमंत्री होतो तेव्हा तेव्हा जातीय द्वेष आणी दंगली का होतात हा निव्वळ योगायोग म्हणावा का..? 2018 ला भिमा कोरेगांव आणी आता #परभणी प्रकरण..? देवेन्द्र फडणवीस हे मुख्यमंत्री होताच दंगली का होतात..? महाराष्ट्राच मूख्यमंत्री पद आणी गृहमंत्री पद घेऊन फडणवीस नेहमी अपयशी ठरतात का..? की संघ प्रणीत दंगल खोरांना रान मोकळे झाल्याचे प्रोत्साहन मिळते..! का नेमके ह्या ताकदी त्यांच्या स्वार्था साठी मूद्दाम आंबेडकरवादी समाजाला सॉफ्ट टारगेट करतात..? हा एक प्रश्नच म्हणावा लागेल.. त्याला कारण ही तसेच आहे ते म्हणजे पेशवाई असो वा बामनवादी हिंदूराष्ट्राचे विचार या देशात त्यांच्या या विचारधारेला विरोध करणाचे काम कायम आंबेडकरवादी समाजाने केले आहे आणी ह्यांचा हा संघर्ष नवा नसून पिढ्यांन पिढ्यांचा संघर्ष आहे..!
~ उर्वरीत क्रमशः
अशा प्रकारे आंबेडकरवादी समाजाला सॉफ्ट टारगेट बनवून कोणत्या तरी कटा साठी वापर केला गेला आहे किंवा सूड उगवण्याचा प्रयत्न झाला आहे..! असो जे काही झाले त्यात आंबेडकरी समाजाच्या तरूण पिढ्या शिक्षणा पासून वंचित करून त्यांना गून्हेगारी पार्श्वभूमी देण्यात मनुवादी राजकीय + प्रशासकीय प्रस्थापित व्यवस्था आज यशस्वी झाली आहे..!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा